Saturday, 24 December 2016

बरसीम चारा पिक लागवड



बरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. या पिकापासून लुसलुशीत, रुचकर आणि पौष्टिक असा भरघोस चारा मिळतो. या पिकास थंड व कोरडे हवामान आवश्‍यक आहे. उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल नाही. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत बरसीम चांगल्या प्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्येसुद्धा हे पीक वाढते; परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम वाढत नाही. एक खोल नांगरट करून एकदा डिस्क हॅरोने ढेकळे फोडून घ्यावीत.
शेणखत पसरवून झाल्यानंतर काकरपाळी करून पिकासाठी योग्य अशी मऊ व भुसभुशीत जमीन तयार करता येते. ढेकळाचे प्रमाण जास्त असल्यास व गरजेप्रमाणे आणखी एक काकरणी करावी. जमीन तयार केल्यानंतर तिची बांधणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दोन मीटर रुंदीचे व जमिनीच्या उतारानुसार लांबी ठेवून वाफे बनवावेत. परंतु दोन मीटर रुंद व दहा मीटर लांब अशा आकाराचे वाफे तयार केल्यास पेरणीसाठी सुलभ व पाण्याच्या पाटामध्ये कमी क्षेत्र वाया जाते. पेरणीपूर्वी मशागत करताना उपलब्धतेनुसार हेक्‍टरी 20 ते 30 बैलगाड्या (10 ते 15 टन) कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. या पिकाला हेक्‍टरी 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश इतकी मात्रा द्यावी. ही सर्व खते पेरणीच्या वेळेसच द्यावयाची आहेत.
या पिकाची पेरणी नोव्हेंबर अखेर पर्यंत पूर्ण करावी म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी थंडी तीन ते चार महिन्यांपर्यंत मिळेल. त्यापासून जास्तीत जास्त म्हणजेच चार कापण्या मिळतील. लागवडीसाठी वरदान, बुंदेल बरसीम 2 व मेस्काव्ही या जातींची निवड करावी. हेक्‍टरी 25 ते 30 किलो इतके बियाणे लागते. बियाण्याची पेरणी करण्याअगोदर बियाणे दहा टक्के मिठाच्या पाण्यामध्ये बुडवावे. असे केल्याने चिकोरी या गवताचे बी पाण्यात तरंगून येते. ते आपणाला सहजरीत्या वेगळे करता येते. बियाणे पाण्यातून बाजूला काढून पोत्यावर घ्यावे. बियाण्यास रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू याची प्रक्रिया करण्यासाठी दर दहा किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम जिवाणू संवर्धक पुरेसे आहे.
हलक्‍या हाताने बियाण्याला पावडर चोळल्यानंतर बियाणे पूर्णतः सावलीमध्ये सुकवून घ्यावे. बियाण्याच्या संवर्धकामुळे गोळ्या झाल्या असतील तर त्या सुकल्यानंतर फोडून घ्याव्यात. अशा रीतीने प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यामध्ये 25 सें.मी. अंतरावर ओळीमध्ये पेरावे. बियाणे साधारणतः दोन ते 2.5 सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलवर पेरणी केल्यास बियाणे उगवणीवर परिणाम होतो. पेरणीनंतर बरसीमची पहिली कापणी 50 ते 55 दिवसांनी करावी. गवताची कापणी जमिनीच्या वर चार ते पाच सें.मी.वर करावी. पहिली कापणी करताना विळे धारदार असावेत जेणेकरून गवत कापताना ठोंब उपटून येऊ नयेत. पिकाच्या नंतरच्या कापण्या 22 ते 25 दिवसांनी कराव्यात.
आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेले गवत मार्च अखेरपर्यंत टिकते. या काळामध्ये एकूण चार कापण्या मिळतात.बरसीमच्या तीन ते चार कापण्यांमध्ये एक हेक्‍टर क्षेत्रामधून सरासरी 60 ते 65 टन एवढा हिरवा चारा मिळतो. भारी जमिनीत चांगली मशागत केल्यानंतर हेच उत्पादन 70 ते 75 टनांपर्यंत पोचू शकते. 
लेखक - श्री. धनंजय गायकवाड
पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)
 

दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी



 दुभत्य जनावरांची काळजी आणि त्यांचा आहार हा एक महत्वाचा घटक आहे, पण हि काळजी हि दरोरोज केली पाहिजे   त्यांना दिलेला आहार हा त्यांना वेळेवर दिला पाहिजे म्हणजे त्यांची प्रकुर्ती हि चांगली राहिली पाहिजे.
खाली दिलेली कमी बाबी मध्ये दिले आहे कि त्याचे काळजी, आहार, स्वच्छता, रोग नियंत्रण, व्यायाम, प्रजनन आणि  राहण्यची सुविधा या बाबींचे सविस्तर माहिती दिले आहे.
1. पाणी:- जनावरांना दरोरोज पुरेसे स्वच्छ किवा ताजे पाणी द्यावे. दुध देणारी गायांना दरोरोज ३० ते ३५ लिटर पाणी लागते पण याच्या वेतेरिक्त गाय प्रती लिटर दुध देण्यसाठी किमान लिटर पाण्यचे गरज असते. या शिवाय उष्णता मुळे पण पाण्यचा वापर जास्त प्रमाणात होतो.
2. आहार:    खाली दिलेले खाद्य हे उर्जा घटक म्हणून दरोरोज वापरले जातात. किलो शेजावलेले बाजरी + नारळ +१०० जीनेथी बी +१०० जीनेपू + १०० ग्रॅम तेल, हे सर्व मिश्रण एक आठवडा गाय दिले पाहिजे.
3. दुध उत्पादना साठी नियमित आहार दिला पाहिजे किलो दिलेले खाद्य पासून कमीत कमी . लिटर दुध मिळते.
      4. गृहनिर्माण:
जनावरांना राहण्यसाठी चांगली व्यवस्त केली पाहिजे म्हणजे उन ,वारा,पाऊस यांच्यपासून स्वरक्षण झाले पाहिजे तसेच, योग्य निचरा, सूर्यप्रकाश वायुवीजन आणि असुरक्षितता असणे आवश्यक आहे. हे घटक निवडले गृहनिर्माण कोणत्याही प्रकारच्या उपलब्ध असणे आवश्यक आहे.
5. स्वच्छता:- गायी स्वच्छ दूध उत्पादन आणि जनावरांच्या आरोग्यासाठी दोन्ही स्वच्छ ठेवले पाहिजे, त्यांना रोज ब्रुश करावा, त्यांची घाण आणि सैल केस काढणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमित केशभूषा त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते, कारण त्यामुळे रक्त अभिसरण मदत होते

6. रोग नियंत्रण: कळप यांचे रोग परजीवी रोग वर नियंत्रण ठेवणे हि सर्वात महत्वाचे आहे. हे साध्य करण्यासाठी, गृहनिर्माण आणि इतर ठिकाणी स्वच्छ आणि तसेच प्रत्येक वेळी नवीन नवीन लसीकरण द्यावे ,जेणेकरून नवीन रोगांवर नियंत्रण होयील जन्वारांना कुठला हि आजार किवा रोग होणार नाही.
7. व्यायाम: जनावरांना दरोरज व्यायाम करणे आवशक आहे म्हणजे त्यांना हालचाल करणे आवशक आहे.
8. दुध काढत्या वेळी घेणारी काळजी: kmso4 हे गरम पाण्यात मिसळून, गायचे कास आणि निपल हे स्वच पाण्यने धुअन घ्यवे पण दुध काढण्य्च्य आघोदर आणि कोरड्या रुमालाने पुसून घावे पुसून झाल्यवर दुध हे योग्य पद्धतीने, स्वच्छतेने, हळूवारपणे शांतपणे काढावे.
9. प्रजनन: गाय हि त्यांचा मुलाला जन्म ६० दिवनानातर दिला पाहिजे प्रजनन झाल्यवर काबर तर त्यचे प्रकुर्ती चांगली राहते.
 लेखक - श्री. धनंजय गायकवाड

पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)